Posts

Showing posts from November, 2019

जंगल तोड – एक समस्या

Image
“ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या अप्रतिम अभंगात तुकोबांनी निसर्गातील पशुपक्षी, वेली यांचे नितांत सौंर्द्य टिपले आहेत. हा अभंग तुकोबांची अनुकंपा, सर्व सृष्टी बरोबरचे त्यांची तद्रूपता यांचे मनोकर आकलन दर्शवतो. हा अभंग आपल्याला पर्यावरणा विषयी खूप काही सांगतो. पर्यावरणात अनेक घटक आहेत. ते आपापसात एकमेकांनी गुंतलेले आहे. जसे की, पाण्याशिवाय जीवन नाही. तसाच प्रकारचे , आपल्या पर्यावरणाच्या भाग म्हणजे झाड. या वृक्षांचा आपल्याला खुप फायदा होत असतो. झाडे नसती तर कदाचीत आपण जीवंत राहिलोच नसतो. पण आता या झाडांना माणूस या प्राण्यापासून धोका निर्माण होऊ लागला आहे. हिंदू संस्कृतीमध्ये वृक्षाला देवता मानली जाते. त्याची पूजा, अर्चा केली जाते. पूर्वी माणूस हा वृक्षाचे महत्त्व समजत होता. त्यामुळे जंगलतोड कमी प्रमाणत होत होती, पण या आताच्या सध्याच्या युगात वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात केली जाते. जंगलेच्या जंगले तोडली जात आहे. लाकूडचा वापर खूप प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत आहे.      जंगलाची उपयुक्तता Ø झाडे हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात आण...