जंगल तोड – एक समस्या
“ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ”
या अप्रतिम अभंगात तुकोबांनी निसर्गातील पशुपक्षी,
वेली यांचे नितांत सौंर्द्य टिपले आहेत. हा अभंग तुकोबांची अनुकंपा, सर्व सृष्टी बरोबरचे
त्यांची तद्रूपता यांचे मनोकर आकलन दर्शवतो. हा अभंग आपल्याला पर्यावरणा विषयी खूप
काही सांगतो.
पर्यावरणात अनेक घटक आहेत. ते आपापसात एकमेकांनी
गुंतलेले आहे. जसे की, पाण्याशिवाय जीवन नाही. तसाच प्रकारचे , आपल्या पर्यावरणाच्या
भाग म्हणजे झाड. या वृक्षांचा आपल्याला खुप फायदा होत असतो. झाडे नसती तर कदाचीत आपण
जीवंत राहिलोच नसतो. पण आता या झाडांना माणूस या प्राण्यापासून धोका निर्माण होऊ लागला
आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये वृक्षाला देवता मानली जाते.
त्याची पूजा, अर्चा केली जाते. पूर्वी माणूस हा वृक्षाचे महत्त्व समजत होता. त्यामुळे
जंगलतोड कमी प्रमाणत होत होती, पण या आताच्या सध्याच्या युगात वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात
केली जाते. जंगलेच्या जंगले तोडली जात आहे. लाकूडचा वापर खूप प्रमाणात केला जात आहे.
त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत आहे.
जंगलाची उपयुक्तता
Ø झाडे हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायु हवेत
सोडतात.
Ø अनेक झाडे ओझोनचे प्रामण
वाढवण्यास मदत करतात.
Ø दुर्मिळ प्राणी, वनौषधी
वनस्पती यांचे जतन जंगलांमुळेच होत असते.
Ø घनदाट जंगलांमुळेच हवेतील
बाष्प शोषून घेतल्याने त्यातील थंडावा राखला जातो.
Ø पावसाची तीव्रता जंगल
भागात अधिक असते. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते आणि भूगर्भातील पाण्याच्या
साठ्यात वाढ होते.
Ø खोलवर रुजलेल्या मुलाच्या
सहाय्याने जमिनीची धूप थांबवली जाते अणि जमिनीची सुपीकता कायम राहते.
वृक्षांचे कार्य
Ø प्राणवायु (ऑक्सिजन) उत्पादन.
Ø हवेचे प्रदूषण थांबवणे.
Ø भूमीचे फलदृपता टिकवणे
आणि भूमीची धूप थांबवणे.
Ø भूगर्भ पाण्याची पातळी
उंचावणे आणि हवेत आद्रता टिकवणे.
Ø पशुपक्षी यांचे आश्रयस्थान.
Ø अन्न निर्माण करणे.
जंगलतोडीचे परिणाम
निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत,
की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच पण ती चक्रे दुरुस्त करणेही जमन्यासारखे
नाही. गेल्या कित्येक वर्षापासून / शतकांपासून जंगल तोडले एवढाच उद्योग माणसे करत आली
आहे. शतासाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी,
खाणींसाठी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी अशा अनेक नानाविध कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो.
त्याचे दुष्परिणाम झोंबू लागले आहेत.
जंगलतोडीमुळे
पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे
ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा
पडत नाही.

दिवसेंदिवस होणार्या जंगल
कटाईमुळे मातीची धूप, वृक्षांची कामरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षअभावी येणारे
पूर अशा समस्या भेडसावत आहेत.
जंगलतोड थांबवण्यासाठी व वनक्षेत्र वाढवण्यासाठी
उपाय
जंगलात माणूस जितकी
कमीत कमी लुडबुड करेल तितके आपले चक्र दुरुस्त करण्याची निसर्गाला संधी मिळते, यासाठी
खालील उपाय करता येतील.
Ø क्रांतीवीरांचे स्मरण, स्वजनांचे प्रेम, देशभक्तांचा अभिमान, विद्वानांचा
आदर व्यक्त करायला त्यांची स्मृती टिकवण्यासाठी इस्त्राईल मध्ये झाडे लावली आणि जोपासना
केली.
Ø एका वृक्षाची तोड केल्यास त्या जागी १० झाडांची लागवड केली पाहिजे.
Ø जागतिक वनदिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक झाड लावून वनदिन साजरा केला
पाहिजे.
सरकारी उपाययोजना
प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये
वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे, पण तरीही
गेल्या काही वर्षात बेसुमार जंगलतोड झाली माणसाला हा हव्यास आहे म्हणूनच आपण
निसर्गसंपदा ओरबाडून तिची वाट लावली आहे. वनाचे संवर्धन करण्यासाठी आता सरकारने
पावले टाकली असून अधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे किती क्षेत्रावर वने आहेत. चोरटी
वृक्षतोड होत आहे का? वन्य जीवांची शिकार होत आहे का?
यावर काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे. वनांच्या परिसरात राहणाऱ्यांची
उपजीविका त्यावर अवलंबून असते. त्यांनी केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, वनौषधी आणि अन्य उत्पादन यांना चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘वन धन योजना’ यासह अनेक उपक्रम सरकारकडून सुरु
करण्यात आले आहेत.
झाडे ही आपल्यासाठी ‘कल्पवृक्ष’ असून ती टिकली तरच उपजीविका
चालू शकणार आहे. हे परिसरातील रहिवाशांना व आदिवासींना पटवून देण्याचे प्रयत्न
करण्यात येत आहेत. त्यामुळे लोकसहभागातून प्राणी व वनसंपदेचे संरक्षण साधता येणार
आहे. पर्यावरणाचे संतुलन साधायचे असेल तर जंगले हवीच. त्यामुळेच वनक्षेत्राच्या
वाढीसाठी सर्वच स्तरांवरून प्रयत्न होताना दिसतात.
वनांचे महत्त्व लोकांना पटावे
आणि सततच्या पडणाऱ्या दुष्काळाला आळा बसव म्हणून शासनाने पुढील प्रकारच्या काही
योजनाही सुरु केल्या आहेत.
Ø महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणार्या टेकड्यांचे हिरवीकरण करणे.
Ø महत्वाचे रस्ते, कालवे आणि रेल्वे लाईनच्या दुतर्फा
वृक्ष लागवड करणे.
Ø वनेत्तर क्षेत्रातील पाणथळे, सरोवरे इत्यादी
जैवविविधतेचे व्यवस्थापन करणे.
Ø उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोपनिर्मितीसाठी वृत्त प्रसारण, महसूल विभागस्तरावर आणि तालुकास्तरावर रोपवाटिका निर्मिती
करणे.
चिपको आंदोलन
चिपको आंदोलन हे झाडांना
वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. हे आंदोलन एप्रिल १९७३ मध्ये अलकनंदा खोऱ्यातील
मंडल गावात “चिपको” आंदोलनाची सुरुवात झाली. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी
स्रीयांनी सहभाग नोंदविला व तोड होणार्या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे
शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली.
वनदिन
जगातील लोकांमध्ये वने आणि वाणापासून मानवाला मिळणारे
विविध फायदे याबाबत जागृती येण्यासाठी दरवर्षी २१ मार्च हा दिवस जागतिक वनदिन म्हणून
साजरा केला जातो. युरोपिअन कृषी परिषदेच्या २३ व्या आमसभेत सन १९७१ साली या संकल्पनेचा
उदय झाला. केवळ वृक्षसंपदा असाच अर्थ न घेता वृक्षांमुळे वातावरणाचे संरक्षण होते,
ते केले जावे, अशी अपेक्षा आहे. दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड हा चिंतेचा
विषय आहे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण टिकवण्यासाठी, गारवा टिकवण्यासाठी, औषधी वनस्पतींची
उपलब्धता, शेतीची अवजारे इत्यादी साठी वाणांची आवश्यकता आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने
सामाजिक वनीकरणाची निर्मिती केली आहे.
जागतिक पर्यावरण दिन
दरवर्षी ५ जून हा दिवस जगतिक
पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे.
हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे.
जंगल तोड थांबविण्यासाठी व माणासांना झाडांचे महत्त्व समजण्यासाठी सरकारने अशा
विविध योजना आखण्यात आल्या असून याचा मानवाला पुढील काळात फायदा होईल म्हणून या
सर्व योजनांचा उद्देश हाच आहे की, रस्त्याच्या
दोन्ही बाजूला झाडे लावली तर येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना सावली मिळेल, प्रवास सुखकारक होईल, वाहनाद्वारे होणार्या कार्बन
मोनोक्साईडद्वारे होणार्या प्रदूषणास आळा बसून या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार कमी
होऊन रस्त्याचे सौंदर्य वाढेल तसेच निसर्ग सौंदर्यातही भर पडेल. स्थानिक लोकांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उजाड आणि पडीक क्षेत्राचा विकास होईल. पर्यावरण
संतुलनास मदत होईल. स्थानिक जैवविविधतेचे जतन होऊन त्यामध्ये वृद्धी होईल.
शासकीय-निमशासकीय क्षेत्रावर होणारे अतिक्रमण रोखल्या जातील. उघड्या आणि मोकळ्या
टेकड्यांवर वृक्षांची लागवड केल्यास भूसंवर्धन आणि जलसंधारण हि संकल्पना
प्रत्यक्षात आणल्या जातील. धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणी आकर्षित करणारी वानराई
असली तर पर्यटकांना आकर्षण निर्माण होईल आणि त्यांची संख्याही वाढेल.
|| झाडे लाव झाडे जगवा ||
Awesome dear
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteSuper
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteHo
DeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteखुप चांगला आहे मला आवडला...
ReplyDelete
ReplyDeletecan i get the number of a hot girl
Ho deto ki
DeleteSupper
ReplyDelete